Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Saturday 8 April 2017

विपश्यना म्हणजे काय?


आजची मुलं अतिशय चपळ (मानसिक व शारीरिकदृष्टय़ा, चंचल नाही) (किंवा अ‍ॅक्टीव्ह) आहेत. त्यांना रोजच्या जीवनात विविध गोष्टींचे ‘एक्स्पोजर’ हे जरा जास्त मिळते म्हणून त्यांच्या चपळतेत भर पडते. त्याला तोंड देताना भल्याभल्या पालकांची काय दमछाक होते हे आपल्याला दिसते. विपश्यना तत्त्वाचा शाश्वतपणा तसेच अंमलबजावणीतील उत्सुकता यांचा मेळ घातला गेला तर शालेय मुलांसाठी त्याचे वेगळे वर्ग घेण्याची गरज कदापी भासणार नाही. शिक्षक हाच बदलाचा दूत बनून विद्यार्थ्यांची सकारात्मक गुणात्मक उंची वाढविण्याचे साधन बनेल.   
https://goo.gl/7Z5laS
मुलांना शिकविणे’ ही एक मोठी साधना आहे. ती साधना उत्तम होण्यासाठी ‘विपश्यना’ हे एक महत्त्वाचे साधन आहे. किंबहुना कुठल्याही तथाकथित सरकारी प्रशिक्षणापेक्षा शिक्षकांमध्ये अध्यापन समृद्धी करण्यास विपश्यना नक्कीच महत्त्वाची भूमीका बजावेल यात शंका नाही. परंतु, शालेय विपश्यना वर्ग, त्यांची उपयुक्तता व अंमलबजावणीविषयी शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशासंदर्भात काही मुलभूत गोष्टींकडे नव्याने बघण्याची गरज आहे.
Read More>>
http://www.loksatta.com/kgtocollege-news/concentration-is-way-peace-31080/lite/


महाराष्ट्र शासन विपश्यना नैमित्तिक रजा GR 
१)https://drive.google.com/open?id=1K9fDwMAWL5JNSkoSbBHoNTBp6r8xZ9MU

२)https://drive.google.com/open?id=1YN9-qDj5D-g_tviqduDraf-OyF8K6k3R

विपश्यना नोंदणी लिंक: 
https://www.dhamma.org/mr/schedules/schgiri

विपश्यना म्हणजे काय?


           विपश्यना, म्हणजे जे जसे खरोखरी आहे, तसे त्याला पाहणे. विपश्यना ही भारतातील अतिप्राचीन ध्यानपद्धतींपैकी एक आहे. सुमारे २५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी तिला पुन्हा शोधून काढली आणि सार्वत्रिक रोगांसाठी सार्वत्रिक उपाय, अर्थात जीवन जगण्याची कला ह्या रूपात सर्वांना सुलभ अशी बनविली. i.e., an जिवन जगण्याची कला. ह्या असांप्रदायिक ध्यानपद्धतीचे मुख्य लक्ष्य म्हणजे मानसिक अशुद्धता पूर्णत: काढून टाकणे आणि परिणामी संपूर्ण मुक्तीचा सर्वोच्च आनंद मिळवणे हे आहे. निरोगीपणा, अर्थात्
फक्त रोग निवारण नव्हे, तर मानवाला सर्व दुःखापासून मुक्त करणे हाच त्याचा उद्देश आहे.
विपश्यना ही स्व-निरीक्षणातून स्व-परिवर्तन घडवणारी जीवन शैली आहे. मन आणि शरीर यांच्यावर क्षणोक्षणी होणाऱ्या परिवर्तनशील घटनांवर तटस्थपणे निरिक्षण करता करताच होणाऱ्या चित्तविशोधनाच्या अभ्यासामुळे आपल्याला सुखशांतीचे जिवन जगण्यास मदत होते. आंतरिक शांती आणि सामंजस्याचा अनुभव येतो.मनाची अशुद्धी समाप्त होते परिणामी मन संतुलित होऊन प्रेम आणि करुणा यांनी परिपूर्ण होते.
आपले विचार, भावना, निर्णय आणि संवेदना ज्या वैज्ञानिक नियमानुसार चालतात ते सिद्धांत स्पष्ट होऊ लागतात. आपल्या प्रत्यक्ष अनुभवाने आपल्याला समजते की, विकार कसे उत्पन्न होतात, बंधने कशी बांधली जातात आणि त्यापासून कशी मुक्तता मिळू शकते. जागृतता, भ्रांतीमुक्तता, स्व-नियंत्रण आणि शांतता हे जीवनाचे गुणधर्म बनून जातात.
परंपरा

गौतम बुद्धांच्या काळापासून आजपर्यंत आचार्यांच्या एका अखंडित साखळीद्वारे विपश्यना साधना चालत आली आहे. या साखळीतले विद्यमान आचार्य *श्री स. ना. गोयेन्का* हे मूळ भारतीय वंशातले असले, तरी त्यांचा जन्म व पुढील पंचेचाळीस वर्षांचा काळ बर्मा (म्यानमार) येथे व्यतीत झाला. तेथे असताना, त्याकाळी बर्मा शासनामध्ये वरिष्ठ हुद्यावर कार्यरत असलेले त्यांचे आचार्य सयाजी उ बा खिन यांच्याकडून विपश्यना साधना शिकण्याचे भाग्य त्यांना प्राप्त झाले. आचार्यांकडून मिळालेल्या चौदा वर्षांच्या प्रशिक्षणानंतर श्री गोयेन्का भारतात स्थायिक झाले आणि त्यांनी सन १९६९ पासून विपश्यना साधना शिकविण्यास सुरुवात केली. त्यानंतर आजपर्यंत पूर्व आणि पाश्चात्य देशांतील सर्व जाती व सर्व संप्रदायातील लाखाहून अधिक लोकांना त्यांनी विपश्यना साधना शिकविली आहे. विपश्यना साधना शिबीरांची वाढती मागणी लक्षात घेऊन सहाय्यासाठी त्यांनी सन १९८२ पासून सहाय्यक आचार्य नेमण्यास सुरुवात केली.
शिबीर

विपश्यना साधनेचे तंत्र दहा दिवसांच्या निवासी शिबीरांत शिकवले जाते, ज्यामध्ये भाग घेणार्‍या साधकांनी नेमून दिलेली अनुशासन संहिता पालन करणे, साधनेच्या मूलभूत पद्धति समजून घेणे, तसेच त्याचा लाभदायक अनुभव घेण्यासाठी योग्य प्रमाणात अभ्यास करणे.
शिबीरामध्ये कष्टाने, गंभीरपणे काम करण्याची आवश्यकता आहे. 

प्रशिक्षणाच्या एकूण तीन पायर्‍या आहेत. त्यातली पहिली म्हणजे शिबीरकाळात हिंसा, चोरी, लैंगिक आचरण, असत्य भाषण आणि मादक पदार्थांचे सेवन यांपासून दूर राहणे. नैतिक वर्तणुकीच्या ह्या साध्या शीलांमुळे मन शांत होते, जे अन्यथा अस्थिर होऊन स्व-निरीक्षणाचे कार्य करण्यासाठी सक्षम राहत नाही. पुढली पायरी म्हणजे आपले लक्ष नैसर्गिक रित्या नाकपुडीत येणाऱ्या व जाणाऱ्या श्वासाच्या बदलत्या प्रवाहाकडे लक्ष केन्द्रित करुन मनाला वश करण्याची कला विकसित करणे. चौथ्या दिवसापर्यंत मन काहीसे शांत व एकाग्र झालेले असते, आणि प्रत्यक्ष विपश्यना साधना सुरू करण्यासाठी सक्षम झालेले असतेः अर्थात शरीरावरील संवेदनांचे निरीक्षण करणे, संवेदनांचा खरा स्वभाव समजून घेणे तसेच त्यांच्या प्रती प्रतिक्रिया न देता समता विकसित करणे. अंतिमतः शेवटच्या दहाव्या दिवशी शिबीरार्थी सर्वांप्रती करूणा किंवा सदभावना म्हणजेच ’मंगल मैत्री’ ची साधना शिकतात, की ज्यामध्ये सर्व प्राणीमात्रांना 
शिबीरांतर्गत निर्माण झालेल्या पुण्याचे भागीदार बनवले जाते.

ही संपूर्ण प्रक्रिया वस्तुत: एक मनाचा व्यायामच आहे. शरीराच्या व्यायामातून जसे आपण शरीराला सुदृढ ठेवतो, तसेच सुदृढ मन विकसित करण्यासाठी विपश्यनेचा उपयोग होऊ शकतो.
ही साधना खरोखरीच सहाय्यकारक असल्याचे लक्षात आल्याने ती तिच्या मूळ, शुद्ध व प्रामाणिक स्वरूपात ठेवण्यावर विशेष भर दिला जातो. त्यामुळेच ती व्यापारीकरणापासून मुक्त आहे. ती शिबीरासाठी येणाऱ्याना विनामोबदला शिकविली जाते. साधना शिकवणार्‍या कोणत्याही आचार्यांना त्यासाठी कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही. शिबीरासाठी कोणतेही मूल्य आकारले जात नाही- अगदी खाणे-पिणे आणि राहण्याचे सुद्धा नाही. सर्व खर्च हा ज्या साधकांनी शिबीर समाधानकारकरित्या पूर्ण केले आहे व ज्यांना आपल्याला मिळालेला लाभ आपल्यानंतर येणार्‍यांनाही मिळावा असे वाटले, त्यांनी केलेल्या ऐच्छिक दानातून भागवला जातो.

अर्थातच साधनेचे सुपरिणाम अभ्यासाच्या निरंतरतेनंतर हळूहळू दृष्टीस पडतात. दहा दिवसात सर्व समस्यांचे निराकरण होण्याची अपेक्षा करणे अवास्तविक आहे. परंतु ह्या काळात विपश्यनेची मूलभूत रूपरेषा शिकता येते, जी आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात आचरणांत आणता येते. साधनातंत्राचा अभ्यास जितका अधिक, तितकी दुःखापासून अधिक मुक्ति होईल, आणि तितके अधिक आपण आपल्या परममुक्तीच्या अंतिम लक्षापाशी जाऊ. अर्थात् दहा दिवसांची साधना सुद्धा असे परिणाम देऊ शकते, जे स्पष्टपणे दिसतील आणि दैनंदिन जीवनात लाभ मिळणे चालू होइल.
गंभीरतापूर्वक अनुशासनाचे पालन करणाऱ्या सर्व लोकांचे विपश्यना शिबीरात स्वागत आहे, जे स्वानुभूतीच्या आधारे ह्या साधनेचे लाभ स्वत: अनुभवू शकतात. जे गंभीरतापूर्वक प्रयत्न करतील, त्यांना विपश्यना हे जीवनात सुख-शांती प्राप्त करण्यासाठी एक प्रभावशाली तंत्र प्राप्त होइल.

विपश्यना साधनाविधी संबंधी प्रश्नोत्तरे


शिबीराचा अवधी १० दिवस का असतो?

वास्तविक १० दिवस सुद्धा ह्या शिबीरासाठी कमीच आहेत ; ज्यामध्ये ह्या साधना विधीची केवळ ओळख व पायाभरणी होते. त्याचा विकास, हे तर आयुष्यभराचे कार्य आहे. विपश्यना ध्यानसाधनेच्या पिढ्यान्‌पिढ्यांच्या अनुभवानंतर असे जाणवले की, १० दिवसांपेक्षा कमी अवधी ठेवल्यास शिबीरार्थी विपश्यना साधना अनुभवाच्या स्तरावर प्रत्यक्ष ग्रहण करू शकत नाहीत. परंपरेनुसार विपश्यना साधना सात आठवड्यांच्या शिबीरांमध्ये शिकविली जात असे. २०व्या शतकाच्या उदयानंतर, ह्या परंपरेच्या आचार्यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, कमीत कमी दिवसामध्ये विपश्यना साधना शिकवण्याचा प्रयोग केला. त्यांनी तीस दिवस, दोन आठवडे, दहा दिवस, अगदी सात दिवसापर्यंतचे प्रयोग केले आणि त्यांनी आढळले की मन स्थिर होण्यास आणि देह-मनाच्या संबंधांचे नियम समजण्यास दहा दिवसांपेक्षा कमी कालावधी पुरेसा ठरत नाही.

दिवसातले किती तास ध्यानसाधना असेल?

पहाटे चार वाजता उठण्यासाठी होणार्‍या घंटेबरोबर सुरू झालेला दिवस रात्री ९ वाजता संपतो. संपूर्ण दिवसभरात सुमारे दहा तासांची ध्यानसाधना असते, ज्यामध्ये अधून मधून काही ठराविक सुट्टी व विश्रांतीसाठी काळ दिला जातो. रोज संध्याकाळी सात वाजता आचार्य श्री. स. ना. गोएंका यांचे वीडियोवर प्रवचन लावले जाते, ज्यामधील संदर्भामुळे साधकांना त्या त्या दिवशीचा त्यांचा अनुभव समजण्यास मदत होते. ही समयसारिणी योग्य असल्याचे व गेली काही दशके शेकडो, हजारो साधकांना लाभदायक असल्याचे सिद्ध झाले आहे.

शिबिरामध्ये कोणत्या भाषेचे माध्यम वापरले जाते?

श्री. स. ना. गोएंका यांनी इंग्रजी व हिंदी भाषांमध्ये पूर्वामुद्रित केलेल्या प्रवचनांसोबत त्यांचे स्थानिक भाषांमधले भाषांतरही लावले जाते. इंग्रजी सोबतच जगातल्या प्रमुख भाषांमधली मुद्रित भाषांतरेही उपलब्ध आहेत. जर शिबिर आचार्याना स्थानिक भाषा नीटपणे अवगत नसेल, तर मदतीसाठी दुभाषा उपलब्ध असेल. ज्याला खरोखर शिबीर करायचे आहे, त्याच्यासाठी भाषा सहसा अडथळा ठरत नाही.

शिबिरासाठी खर्च किती येतो?

शिबिरात आलेल्या प्रत्येक साधकाचा खर्च हा अगोदरच्या शिबिरार्थी कडून भेट स्वरूप मिळालेला असतो. साधना शिकवण्यासाठी किंवा जेवणासाठी किंवा राहण्यासाठी कोणतेही मूल्य आकारले जात नाही. जगभरातली सर्व विपश्यना शिबिरे संपूर्णत: ऐच्छिक देणग्यांवर घेतली जातात. शिबीर पूर्ण झाल्यानंतर जर आपल्याला आलेल्या अनुभवांचा काही उपयोग झाला असेल, तर येत्या शिबिरासाठी आपल्या इच्छेप्रमाणे व ऐपतीप्रमाणे देणगी देण्यास आपले स्वागत असते.

शिबीर घेण्यासाठी आचार्यांना किती मानधन दिले जाते?

आचार्यांना कोणतेही मानधन, देणगी अथवा भौतिक लाभ दिला जात नाही. त्यांना त्यांच्या चरितार्थासाठी स्वत:चे वैयक्तिक उत्पन्नाचे साधन असणे अपेक्षित असते. ह्या नियमामुळे कदाचित काही आचार्यांना शिकवण्यासाठी कमी वेळ मिळत असला, तरी ह्या नियमामुळे शिबीरार्थींचे शोषणापासून रक्षण होते आणि साधनेचे व्यावसायिकरण होण्यापासून बचाव होतो. ह्या परंपरेमध्ये आचार्य केवळ सेवाभावाने विपश्यनेचे दान करतात. शिबीराच्या समाप्ती नंतर साधकांना होणारा आनंदच त्यांचे पारिश्रमीक असते, (समाधान असते)
मी मांडी घालून बसु शकत नाही. तरीही मी साधना करू शकेन का?
निश्चीतच. जे वयामुळे अथवा काही शारिरीक कारणांमुळे जमिनीवर बसु शकत नाहीत त्यांच्यासाठी खुर्च्या उपलब्ध असतात.

मला विशेष जेवणाची आवश्यकता आहे. मी स्वतःचे जेवण आणू शकतो का?

जर आपल्याला डॉक्टरानी विशेष जेवण सांगितले असेल तर आम्हाला तसे कळवावे. आम्ही ते जेवण उपलब्ध करू शकतो का हे पाहू. जर जेवण अतिशय विशेष असेल अथवा साधनेमध्ये बाधा उत्पन्न करणारे असेल, तर आम्ही आपल्यास जेवणाचे निर्बंध कमी होईपर्यंत थांबण्याची विनंती करू शकतो. ह्याबद्दल आम्ही क्षमा मागतो परंतु साधकांना स्वतःचे जेवण न आणता, व्यवस्थापनाद्वारे दिल्या गेलेल्या भोजनातूनच आपले भोजन प्राप्त करण्याचा नियम आहे. अधिकतर साधकांना उपलब्ध भोजनाचे पर्याय पुरेसे आहेत असे आढळते आणि ते साध्या शाकाहारी भोजनाचा आनंद घेतात.

गर्भवती स्त्रिया शिबीरामध्ये भाग घेऊ शकतात का? त्यांच्यासाठी काही विशेष व्यवस्था अथवा सूचना आहेत का?
 गर्भवती महिला निःसंशयपणे शिबीरामध्ये भाग घेऊ शकतात. कित्येक गर्भवती महिला खासकरून शिबीरामधे सम्मिलित होण्यासाठी येतात, ज्यायोगे त्या अशा विशेष समयी मौन साधून गंभीरतापूर्वक साधना करण्याच्या संधीचा लाभ घेऊ शकतात. आम्ही गर्भवती स्त्रियांना निवेदन करतो की शिबीरामध्ये सम्मिलित होण्यापूर्वी आपण गर्भ स्थिर असल्याचे निश्चीत करावे. गर्भवती स्त्रियांना त्यांच्या आवश्यकतेनुसार पर्याप्त मात्रेमध्ये भोजन दिले जाते तसेच त्यांना आरामपूर्वक साधना करण्यासाठी सांगितले जाते.

शिबीरामध्ये मौन का असते?

शिबीरात हजर असणारे सर्व साधक “आर्य मौन” चे पालन करतात—म्हणजेच, शरीर, वाणी व मनाची शांतता. त्यांची सहाध्यायी साधकाबरोबर सम्पर्क साधण्यास मनाइ असते. तरीसुध्दा, साधक त्यांच्या भौतिक आवश्यकतेसाठी व्यवस्थापनाशी संपर्क करण्यास स्वतंत्र आहेत, व प्रशिक्षकाशी बोलू देखील शकतात. मौन पहिल्या संपुर्ण नउ दिवसासाठी पालन करावे लागते. दहाव्या दिवशी पुर्ववत सर्वसाधारण जिवन स्थापित करण्यासाठी बोलण्यास आरंभ होतो. अभ्यासाची निरंतरता हेच ह्या शिबीराच्या यशस्विततेचे रहस्य आहे; ही निरंतरता राहावी यासाठी मौन हे अत्यावश्यक आहे.

मी साधना करु शकेल याची खात्री काय?

ज्याला खरोखरच आस्था आहे आणि मनापासून प्रयत्न करणार असेल अशा माफक शरिरीक आणि मानसिक स्वास्थ असलेल्या व्यक्तीस, साधना ( आर्य मौनासहित ) करणे कठीण नाही. जर आपणास दिलेल्या सुचना धैर्याने आणि दक्षतेने पाळणे शक्य झाल्यास आपण खऱ्या परिणामाबद्दल निश्चिंत रहा. दैनंदिन समयसारिणी जरी भितीदायक वाटली तरीसुध्दा ती कडक नाही की शिथील नाही. शिवाय शांततापुर्ण आणि उपयुक्त वातावरणात नेकीने साधना करणाऱ्या दुसऱ्या साधकांची उपस्थिती एकाद्याच्या प्रयत्नाला प्रचंड सहाय्य करते.
शिबीरात कुणी भाग घेऊ नये असे आहे का?

प्रत्यक्षांत समयसूची पाळण्यास शारिरीक दृष्ट्या दुर्बळ असेल तर त्याला शिबीरापासून फायदा मिळणार नाही. मनोविकार दुखणे भोगत असलेल्या व्यक्तिबाबत हेच सत्य असेल, किंवा जो कुणी भावनिक चढउतार अनुभवत असेल अशांना देखील हे लागू आहे. प्रश्न-उत्तराच्या पध्दतीनुसार तुम्हाला शिबीरापासून पुर्ण फायदा मिळेल किंवा कसे याचा निर्णय आधीच घेणे आम्हाला शक्य होईल. काही बाबतीत अर्जदाराला प्रवेश देण्याआधी आम्ही त्यांच्या डॉक्टरांची अनुमती आणण्यास सांगतो.

विपश्यना शारिरीक किंवा मानसिक आजार बरे करते काय?

पुष्कळसे रोग आपल्या मनांतील अंतस्थ प्रक्षुब्धतेमुळे उत्पन्न होतात. जर प्रक्षुब्धता दूर केली तर रोग कमी होतील किंवा नाहीसे होतील. परंतू रोगाना बरे करण्याच्या उद्देशाने विपश्यना शिकायला आलात तर ती चुक आहे व कधीच यशस्वी होणार नाही. जे लोक असे करण्याचा प्रयत्न करतात ते आपला वेळ वाया घालवतात कारण ते चुकीच्या लक्षावर केंद्रीत करतात. ते आपले नुकसान सुध्दा करु शकतात. ते योग्यरितीने साधना तर समजू शकणारच नाहीत पण रोगमुक्त होण्यांत यशस्वी होणार नाहीत.

औदासिन्याबद्दल काय? विपश्यना हे बरे करते काय?

तरीही विपश्यनेचा उद्देश रोग बरा करण्यासाठी नाही. खरोखरच जो कोणी विपश्यनेचा अभ्यास करतो तो सर्व परिस्थितीत समतोल आणि आनंदी रहाण्यास शिकतो. परंतु गंभीर मानसिक दौर्बल्याची पार्श्वभुमी असल्यास ती व्यक्ती तंत्रज्ञान योग्यरितीने उपयोगात आणू शकणार नाही आणि अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत. अशा व्यक्तिसाठी चांगली बाब म्हणजे त्याने आरोग्य व्यावसाईकाबरोबर काम करावे. विपश्यना आचार्य साधनेचे तज्ञ आहेत, मनोविकार तज्ञ नव्हेत.

विपश्यना लोकांना मानसिकदृष्ट्या असमतोल करील का?

नाही. विपश्यना तुम्हाला सजगता आणि मनाचा समतोलपणा शिकविते, म्हणजेच जिवनांत चढ उतार असून सुध्दा संतुलितपणा येतो. परंतु जर कोणी आपले गंभीर भावनिक प्रश्न गुप्त ठेवून शिबीरांत आला तर त्याला तंत्र पध्दती समजण्यात अडचण किंवा अपेक्षित परिणाम मिळण्यासाठी योग्य रीतीने आचरणात आणणे शक्य होणार नाही. म्हणूनच आम्हाला तुमचा पुर्व इतिहास कळविणे आवश्यक असून त्यामुळे शिबीरापासून तुम्हाला लाभ मिळेल किंवा कसे याचा आम्ही निर्णय करु.

विपश्यनेचा अभ्यास करण्यासाठी मला बुध्दीस्ट व्हावे लागेल का?

पुष्कळशा सांप्रदायिक व असांप्रदायिक लोकांना ही साधना उपयोगी आणि फायदेशीर दिसून आली आहे. विपश्यना ही जगण्याची कला आहे, जगण्याची शैली आहे. जरी हा बुध्दाच्या शिकवणीचा अर्क असला तरी हा संप्रदाय नाही; पुष्कळ अंशी ही एक स्वतःच्या भल्यासाठी आणि दुसऱ्यांच्या भल्याकडे जीवन घेऊन जाणाऱ्या मानवी मूल्यांची मशागत आहे.

मला पूर्ण दहा दिवस का रहावे लागेल का?

विपश्यना ही पायरीपायरीने शिकविली जाते, अगदी शिबीराच्या अंतापर्यंत रोज एकेक पाऊल पुढे जाऊन शिकविली जाते. जर आपण लवकर गेलो तर आपण पुर्ण तंत्र शिकू शकत नाही आणि आपल्याला ह्या तंत्राचा लाभ मिळण्यापासून वंचीत रहाल. शिवाय नेटाने ध्यान केल्यामुळे शिबीरात भाग घेणारा ह्या पध्दतीचा संस्कार करतो की ज्यामुळे हे शिबीराची समप्ति परिपुर्ण होते. ही पध्दत पुर्ण होण्याआधी मध्येच व्यत्यय आणणे इष्ट नाही.

शिबीर मध्येच सोडण्यापासुन धोका आहे का?

मुद्दा असा आहे की लवकर जाणे म्हणजे स्वतःचा बदल अपूरा आहे. तुम्ही स्वतःला पुर्ण तंत्र शिकण्याची संधी देत नाही आणि म्हणुनच दैनंदिन जीवनांत यशस्वी उपयोग तुम्ही करु शकणार नाही. तुम्ही खऱ्या निर्णायक शेवटाला जाण्याआधी ह्या पध्दतीला मध्येच व्यत्यय आणता. एक दोन दिवस आधी घरी जाण्याने तुम्ही गुंतविलेल्या वेळेचा अपव्ययच होतो.
दहाव्या दिवसानंतर जेव्हा मौन सुटते आणि बोलायची परवानगी मिळते आणि गंभीर साधना समाप्त होते तेव्हा मी जाऊ शकतो का ?

पुन्हा सामान्य जीवनाकडे वळण्याच्या बदलासाठी दहावा दिवस अतिशय महत्वाचा आहे. ह्या दिवशी कुणालाही सोडून जाण्याची परवानगी मिळणार नाही.

सौजन्य :

विपश्यना संदर्भात काही वाचनीय लेख :

१.सुंदर जगण्यासाठी विपश्यना


२.विपश्यना- समज आणि गैरसमज.


3.विपश्यना: माझा प्रत्यक्ष अनुभव: अद्ययावत


४.‘विपश्यना’ : एक आर्त अनुभूती

५.विपश्यना -एक आनंददायी अनुभूती !

1 comment:

  1. We have given you great information, we hope that you will continue to provide such information even further. Read More...Kesar ke Fayade

    ReplyDelete

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता